AYUSH - place for all tribal professionals

AYUSH promo

Congratulation to Mr. Jivya Soma Mhase! Padmashree (Warli art)

news - पुस्तकाविना शिकताहेत आदिवासींची मुले

news for your  information -
 
------------------
 
 
 
पुस्तकाविना शिकताहेत आदिवासींची मुले
19 Feb 2010, 0147 hrs IST 
 

 
- म. टा. वृत्तसेवा , पालघर


पालघर शहरालगत आदिवासी प्रकल्पामार्फत चालविल्या जाणाऱ्या होस्टेलवर उच्च शिक्षण घेत असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना गेल्या तीन वर्षांत अभ्यासक्रमातील पुस्तकेच सरकारने उपलब्ध करून न दिल्याने ही मुले पुस्तकाविनाच शिक्षण घेत आहेत!

दुर्गम भागातील आदिवासींची मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून राज्याच्या आदिवासी विकास प्रकल्पामार्फत राबविण्यात येत असलेल्या उच्च शिक्षण मोहिमेतील अनेक विद्याथीर् राज्यातील वेगवेगळ्या होस्टेलवर राहून शिक्षण घेत आहेत. पालघर शहरालगत पिडको औद्योगिक वसाहतीत आदिवासी मुलांच्यासाठी असेच होस्टेल असून तेथे ७५ विद्याथीर् शिकत आहेत. त्यातील एफवाय, एसवाय व टीवाय असे ३५ विद्याथीर् पालघर कॉलेजला शिक्षण घेत आहेत. मागणी करूनही या विद्यार्थ्यांना गेल्या तीन वर्षांत अभ्यासक्रमातील एकही पुस्तक आदिवासी विकास विभागाकडून मिळाले नाही. त्यामुळे कॉलेजमध्ये जे शिकवले जाते किंवा नोट्स दिल्या जातात. त्यावर, तसेच लायब्ररीतील पुस्तके अभ्यासाकरिता नेऊन आजवरचे शिक्षण या मुलांनी पूर्ण केले आहे.

शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना वह्याही आदिवासी प्रकल्पातूनच पुरविल्या जातात. या होस्टेेलमधील विद्याार्थ्यांना केवळ १०० पानी सहा वह्या वर्षभरात पुरविल्या आहेत. त्या पहिल्या दोन महिन्यांतच भरल्या असल्याने आथिर्क स्थिती चांगली नसतानाही स्वत: खर्च करून वह्या आणून अभ्यास करत आहेत. या होस्टेलवर विद्यार्थ्यांसाठी आणलेले कम्प्युटर गेली दोन वर्षे बंद असून होस्टेलवर दिसतच नाहीत. ११ वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांना दिवाळीनंतर पुस्तके देण्यात आली. होस्टेल औद्योगिक क्षेत्राला लागून असल्याने बोअरवेलचे प्रदूषित पाणी प्यावे लागते.

होस्टेलवर १२५ विद्यार्थ्यांची राहण्याची क्षमता असली तरी प्रत्यक्षात ७५ विद्याथ्यार्नांच प्रवेश दिला जातो. आजही या होस्टेलवरील चार खोल्यांमध्ये अन्य सामान ठेऊन बंदच ठेवल्या आहेत. होस्टेेलपासून कॉलेज पाच किमीवर असल्याने विद्याथीर् चालतच जातात. सायकली घेऊन दिल्यास त्याचा फायदा होईल, अशी मागणी केली. मात्र, तिचा विचारच केला नाही. कॉलेज सकाळी ६.४५ वाजता असल्याने विद्याथीर् काही न खाताच जातात. जेवणाबाबत तर विचारायची सोय नाही. मंत्र्यांनी भेट दिल्यावरही सुधारणा दिसत नाहीत. वेगवेगळ्या विषयांबाबत विद्यार्थ्यांनी वॉर्डन आठवले यांच्याकडे तक्रार केली असता वॉर्डन दम देतात. डहाणू प्रकल्प अधिकाऱ्याकडे याबाबत लिखीत स्वरूपात तक्रार केली असता तेथील शिक्षणाधिकारी हेमंत पाटील यांनी होस्टेलमधूनच काढून टाकण्याची धमकी विद्यार्थ्यांना दिल्याने त्यांच्यापुढे शिक्षणाचा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
 
 
 

welcome to our page

hi friends welcome to our page !

this is place for all who belongs to Ashram shala any how.

aashram schools are run by ITDP [Integrated Trbal Developement Project Dahanu] [Ekatmik aadivasi vikas prakalp dahanu] which is playing important role to educated our tribals,runs many programmes for tribal developement...

# main aim behind creating this page is -
- connect the past students from ashram shala
- connect professionals & students to share knowledge & career related issues
- to collect feedback & improvement opporunities for better life of tribal students
- this place is to share opinion/ suggestions about improving the performance of ITDP work. at many places ITDP's work can be done in better way, so please list the suggestions.

this is like allumuni of all past student of Govt Ashram school (shashkiy aashram shala )..

so please help our students for there bright future & also to ITDP to do work in better way.

join AYUSH mail blast at adiyuva@gmail.com





our pages -

www.adiyuva.in

www.warli.adiyuva.in

www.dahanu.adiyuva.in

www.peoples.adiyuva.in

www.ayi.adiyuva.in

www.shala.adiyuva.in

www.talasari.adiyuva.in

www.kasa.adiyuva.in

www.aba.adiyuva.in

www.manus.adiyuva.in
Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites More